संसाधने

आमच्या बातम्या आणि लेख

सरकारी डॉक्टर होणे नको रे बाबा....!!!

आरोग्य यंत्रणेतील संकटे आणि सरकारी डॉक्टरांचा घटता विश्वास
प्रकाशित दिनांक : २८ ऑगस्ट २०२५

अलीकडच्या काळात सरकारी डॉक्टर आणि सरकारी दवाखान्यावर विश्वास कमी झालेला दिसून येतो. त्याचप्रमाणे डॉक्टर हे सुध्दा ग्रामीण पातळीवर सरकारी नोकरी करण्याकरीता तयार नाहीत. त्याचे अद्याप प्रशासनाने असो वा कोणत्याही पक्ष्याचे सरकार असो कोणीही याकडे लक्ष दिलेले नाही. सरकारी डॉक्टर किती महत्वाचे आहेत व सरकारी आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे महत्व हे पहिल्यांदा कोरोना काळामध्ये सर्वांना कळाले. खरे पाहता काही वर्षा पूर्वी ही परिस्थिती नव्हती. साधारणता २० वर्षा आधी जनसामानांना सरकारी दवाखान्यावर व सरकारी डॉक्टर वर संपुर्ण विश्वास होता.

सुप्रसिध्द मेडिकल महाविद्यालयातील तज्ञ डॉक्टर हे आपापल्या जिल्ह्यात येवून सरकारी दवाखान्या मध्ये नोकरी करायला सुरुवात करायचे. ते त्या संपुर्ण जिल्ह्यासाठी, तालुक्यातील किंवा गावासाठी संपुर्ण पणे समर्पित असायचे. इतकेच नाही तर जास्तीत जास्त डॉक्टर हे सायंकाळी त्याच्या घरी देखील रुग्ण पाहत असत. काही ठिकाणी गावातील जेष्ठ नागरिक हे त्यांना खाजगी दवाखाना देखील फावल्या वेळात चालवावा म्हणून जागा देखील देत असत. त्यामुळे जास्तीत असत वैद्यकीय अधिकारी हे मुख्यालायीच राहत व २४ तास सेवा देत असे. त्यामुळे गावातील तसेच सर्व पातळीवर वैद्यकीय अधिकारी हे उपलब्ध देखील होते व जनसामान्यामध्ये त्यांना प्रचंड आपुपली होती. बऱ्याच ठिकाणी दुसऱ्या जिल्ह्यातुन आलेले वैद्यकीय अधिकारी हे जिथे नोकरी लागली तिथेच स्थायी देखील झाले आहे. याचे अनेक उदाहरण हे आपल्या समोर दिसून येतील. त्याचप्रमाणे वैद्यकीय पेशा असल्यामुळे स्थानिक प्रतिनिधी व गावातील लोक हे वैद्यकीय अधिकारी यांना हवी ती मदत करत होते व त्यांना जेवण, राहावयाची घर देखील देत असत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहसा गोरगरीब परिस्थिती मधून शिकलेली मुले-मुली एम.बी.बी.एस. करत असत त्यामुळे डॉक्टर झाल्यावर त्यांच्या अपेक्षा देखील खूप जास्त नसायच्या. या काळामध्ये खाजगी दवाखाने देखील जास्त नव्हते त्यामुळे महाराष्ट्रातील सरकारी आरोग्य यंत्रणा ही अतिशय उत्तम व सक्षम यंत्रणा होती. त्यामुळे आपण त्यावेळी देखील वेळोवेळी आलेल्या साथीच्या रोगांवर मात करु शकलो. परंतु वाढती खाजगी वैद्यकीय महाविद्यालय, त्यातुन लाखो आणि करोडो प्रवेश शुल्क भरुन एम.बी.बी.एस., एम.डी. करण्याचे प्रमाण वाढले, त्यामधुन निघालेले डॉक्टर यांना शासकीय यंत्रणे मध्ये येण्यापेक्षा स्वबळावर खाजगी दवाखाने उभारणे व त्यामधुन जास्तीत जास्त फायदा मिळवणे सोपे होते. वेळोवेळी आलेल्या साथीच्या रोगांवर मात करु शकलो. परंतु वाढती खाजगी वैद्यकीय महाविद्यालय, त्यातुन लाखो आणि करोडो प्रवेश शुल्क भरुन एम.बी.बी.एस., एम.डी. करण्याचे प्रमाण वाढले. त्यामधुन निघालेले डॉक्टर यांना शासकीय यंत्रणे मध्ये येण्यापेक्षा स्वबळावर खाजगी दवाखाने उभारणे व त्यामधुन जास्तीत जास्त फायदा मिळवणे सोपे होते. खाजगी दवाखान्यासोबत च मल्टीस्पेसिअलिटी हॉस्पिटल हे कार्पोरेट सेक्टर ने उभारले ज्यामध्ये अनेक डॉक्टर नसलेल्या व्यावसायिकांनी देखील गुंतवणुक करणे सुरु केले व जनसामान्यांना आकर्षिक केले. हळुहळु सरकारी डॉक्टरांना देखील मल्टीस्पेसिअलिटी हॉस्पिटल मध्ये शासनापेक्षा दुप्पट-तिप्पट पगार देवून कामावर ठेवुन घेतले. हे सर्व घडत असतांना जे डॉक्टर या सेवा शासकीय यंत्रने मध्ये असतांना मोफत देत होत त्याचे सेवेसाठी जनसामान्यांना पैसे मोजावे लागू लागले.

शासकीय यंत्रणे मध्ये नियमित पणे डॉक्टरांची कमी होत असलेली संख्या यावर मागील जवळपास १५ ते २० वर्षापासुन लक्ष का दिलेले नाही? हि एम गंभीर बाब आहे याचे जबाबदार कोण? आजच्या जागतिक महामारी मध्ये शासकीय यंत्रणेमध्ये अतिशय अल्प डॉक्टर आहेत त्याला जबाबदार कोण? शासनाचे धोरण हे वैद्यकीय क्षेत्राकडे कमी का होते? कदाचित हि महामार २०२० मध्ये नसती तर हे कोणाला कळाले देखील नसते की सरकारी डॉक्टर खर्च कमी आहेत.

अडचणी व समस्या या असंख्य आहेत परंतु शासकीय यंत्रणेत डॉक्टर का येत नाहीत त्याबाबत प्रकाश टाकू इच्छितो.

  1. वैद्यकीय अधिकारी यांना अतिशय अल्प वेतन सातवे वेतन आयोग लागून देखील नविन रुजू झालेला वैद्यकीय अधिकारी यांचे वेतन ६५०००-६९००० रुपये एवढे शासन देते. ते देखील कधीच नियमित होत नाही. त्यासाठी जिल्हा कार्यालयातील भ्रष्ट व त्रासदायक लिपिक वर्ग, नविन वैद्यकीय अधिकारी याला कोणतेही सहकार्य करत नाही. यांच्या त्रासाला कंटाळुन जवळपास ३०-४०% वैद्यकीय अधिकारी हे नोकरी सोडून देतात. या वेळी त्या वैद्यकीय अधिकारी ला कोणीही मदत किंवा सांत्वना देत नाहीत. खाजगी दवाखान्यात एम.बी.बी.एस., डॉक्टर हे २,००,००० पेक्षा जास्त कमवू शकतात, वैद्यकीय अधिकारी यांना खाजगी व्यवसाय रोध भत्ता हा फक्त ८००० च्या घरात भेटतो. यावर शासनाने कोणतेही धोरण नाही (शासन निर्णयानुसार मूळ वेतनाच्या ३३ टक्के मिळावा), वैद्यकीय अधिकारी हे पद गट-अ असून वर्षे नु वर्षे परीवेक्षा कालावधी समाप्त होत नाही. त्यामुळे कमी कमी ५ तर जास्तीत जास्त १५ वर्ष पर्यंत वैद्यकीय अधिकारी हा मूळ पगारावरच राहतो. नियमित वेतन वाढ देखील मिळत नाही. यावर आज पर्यंत कोणीही निर्णय घेतला नाही. त्यामुळे नविन पिढी रुजू होण्यासाठी टाळाटाळ करत आहे. इतर भत्ते तर बाबूंनी लावले तर भेटतात (त्यासाठी बाबूंचे खिसे गरम करावे लागतात)
  2. कामाची वेळ निश्चित नाही (८ तास असावी) नावावर गावात वेगळेच राजकारण चालत असते. याचा अनुभव नविन रुजु झालेल्या डॉक्टर ला बरेच वेळा येतो. स्थानिक पदाधिकारी यांच्यातील समस्येचे निराकरण हे तेच जिल्हा परिषद मधुन किंवा पंचायत समिती मधुन करु शकतात परंतु सर्व समस्येचे निराकरण हे वैद्यकीय अधिकारी यांनीच करावे हे अपेक्षीत असते. त्यांनी म्हटल्या प्रमाणे डॉक्टर हे उपचार करावा त्यांनी म्हटल्या प्रमाणे प्रमाणपत्र द्यावे, त्यांनी म्हटलेल्या रुग्णाला रेफर करावे किंवा त्यांनी सांगितलेल्या रुग्णाची नॉर्मल प्रसुती करावी, त्यांच्या जवळच्या कर्मचाऱ्यांना काम सांगु नये. हे असे चित्र पाहुन वैद्यकीय अधिकारी याला समजतच नाही की नेमक काय करायचे आहे. व वैद्यकीय अधिकारी यांनी कधी-कधी वापरलेल्या सरळ व स्पष्ट शब्दाला धरुन त्याची तक्रार केली जाते. कित्येकदा त्याची पदस्थापना देखील बदलली जाते. या अश्या प्रकरमुळे बरेच प्रा आ केंद्र विना डॉक्टर याबाबत सर्व पातळीवर कित्येकदा विचारणा संघटनेचे मार्फत करण्यात आली. परंतु कामाची वेट अद्याप निश्चित केलेली नाही. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर एकच वैद्यकीय अधिकारी असतो किंवा कधी कधी एक हि नसतो त्यामुळे बाह्यरुग्ण तपासणी कार्याक्षेत्रात भेट या नंतर वैद्यकीय अधिकारी यांनी किती वाजे पर्यंत काम करावे याची वेळ निश्चित नाही. २४ तास सेवा जर प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर द्यायची असेल तर कमीत कमी ३ डॉक्टर प्रा. आ. केंद्र वर भरलेले पद असावे व कार्य क्षेत्रात वेगळे डॉक्टर द्यावे. परंतु या उलट जो वैद्यकीय अधिकारी प्रामाणिक पणे काम करतो किंवा मुख्यालयी राहतो त्याला देखील त्याच्या वैयक्तिक कामासाठी सुट्टी मिळत नाही. आणि स्थानिक लोकांच्या अपेक्षा त्या एकाच डॉक्टर कडून वाढतात. तेच गावकरी एखाद्यावेळी डॉक्टर नसेल तर त्याची तक्रार करुन बदली करण्यासाठी भाग पडतात. त्यानंतर त्या प्रा आचे आहेत. याचा सरळ सरळ त्रास हा त्याच गावातील गोर गरीब केंद्राचे ते पद वर्षानु वर्षे रिक्त राहीले तरी चालेल.
  3. प्रशासकीय कामाचे कोणतेही प्रशिक्षण रुजू होण्यापूर्वी दिले जात नाही. आय.ए.एस. उत्तीर्ण झाल्यावर देखील त्यांना प्रशासकीय कामासाठी १ वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते. इतर देखील विभागात रुजू होण्यापूर्वी प्रशिक्षण दिले जाते. वैद्यकीय अधिकारी यांना एम.बी.बी.एस. झाल्यानंतर सरळ प्रा. आ. केंद्राचा राजपत्रिक अधिकारी म्हणून संपुर्ण आर्थिक व प्रशासकीय कार्यभार दिला जातो. अश्या शुन्य अनुभव असलेल्या नविन वैद्यकीय अधिकारी यांना एक-दोन न्यायायीन प्रकरण व एक-दोन माहिती अधिकार आले की नोकरी सोडून मोकळे होतात, कारण एक तर त्यांना त्याबाबत माहिती नसते, दुसरे त्यांना कोणत्याही वरिष्ठ स्तरावरुन मार्गदर्शन मिळत नाही. रुग्णसेवा व इतर राष्ट्रीय कार्यक्रम सांभाळुन अप्रशिक्षीत वैद्यकीय अधिकारी याला आर्थिक व प्रशासकीय प्रशिक्षण का दिले जात नाही? यावर आज पर्यंत कोणताही निर्णय घेतला नाही.
  4. मुख्यालयाच्या नावावर टांगती तलवार फक्त वैद्यकीय अधिकारीच नाही तर सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांच्या नियुक्ती आदेशात मुख्यालयी राहुन सेवा देणे असे नमुद आहे. परंतु तलाठी असो. ग्रामसेवक असो. शिक्षक असो वा इतर कोणत्याही विभागाचे वरिष्ठ अधिकारी तालुका स्तरावर देखील मुख्यालयी राहत नाही. फक्त वैद्यकीय अधिकारी यांनीच २४ तास मुख्यालयी राहावे हा कठोर नियम असल्यामुळे कोणताही एम.बी.बी.एस. झालेला डॉक्टर हे गावातच राहावे असे का अपेक्षित आहे. गावातील स्थायी लोक देखील मुलांच्या शिक्षणासाठी शहरात जावून राहतात मग वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत याच तक्रारी का? इतर अधिकारी गावपातळीवर गावकार्यांसाठी नाहीत का? या तक्रारीच्या भीतीने नविन डॉक्टरा गावात यायला तयार नाहीत.
  5. गावातील स्थानिक राजकारण गावात प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवा व डॉक्टर च्या नावावर गावात वेगळेच राजकारण चालत असते. याचा अनुभव नविन रुजु झालेल्या डॉक्टर ला बरेच वेळा येतो. स्थानिक पदाधिकारी यांच्यातील समस्येचे निराकरण हे तेच जिल्हा परिषद मधुन किंवा पंचायत समिती मधुन करु शकतात परंतु सर्व समस्येचे निराकरण हे वैद्यकीय अधिकारी यांनीच करावे हे अपेक्षीत असते. त्यांनी म्हटल्या प्रमाणे डॉक्टर हे उपचार करावा त्यांनी म्हटल्या प्रमाणे प्रमाणपत्र द्यावे, त्यांनी म्हटलेल्या रुग्णाला रेफर करावे किंवा त्यांनी सांगितलेल्या रुग्णाची नॉर्मल प्रसुती करावी, त्यांच्या जवळच्या कर्मचाऱ्यांना काम सांगु नये. हे असे चित्र पाहुन वैद्यकीय अधिकारी याला समजतच नाही की नेमक काय करायचे आहे. व वैद्यकीय अधिकारी यांनी कधी-कधी वापरलेल्या सरळ व स्पष्ट शब्दाला धरुन त्याची तक्रार केली जाते. कित्येकदा त्याची पदस्थापना देखील बदलली जाते. या अश्या प्रकरमुळे बरेच प्रा आ केंद्र विना डॉक्टर चे आहेत. याचा सरळ सरळ त्रास हा त्याच गावातील गोर गरीब जनतेला होतो.

शासकीय यंत्रणेमध्ये येणारे वैद्यकीय अधिकारी हे त्यांच्या परिस्थितीमुळे येतात व गरिबीतुन शिकलेले डॉक्टर च येतात. त्यापुर्वी त्यांना कोणताही अनुभव नसतो. त्यामुळे त्यांना समजुन घेणे देखील अत्यंत आवश्यक आहे. एक ते दोन वर्षा नंतर त्यांना स्थानिक लोकांचा व आरोग्य यंत्रणेचा अंदाज येतो. सुरवातीचे २ ते ३ वर्ष जर लोकांनी व शासनाने वरील अडचणी याचे निराकरण केले तर नक्कीच आपल्या रिक्त असलेल्या आरोग्य यंत्रणेमध्ये लवकरच वैद्यकीय अधिकारी येतील. सर्व वैद्यकीय अधिकारी सर्व बाबतीत परिपकव असतात असे नाही परंतु वरील काही साध्या व सोप्या अडचणीचे निराकरण शासनाकडुन अतिशय तत्परतेने व प्राधान्याने झाले तर नक्कीच आपली आरोग्य यंत्रणा पुर्वी सारखी सक्षम होईल अशी आशा व्यक्त करतो. शासनाने या कोरोना काळात तरी आता या गंभीर विषयाला समजून घेवून निराकरण करणे आवश्यक आहे अन्यथा या प्रश्नांचे निराकरण कधीच होणार नाही.

एक कविता माझ्या सर्व कोविड मध्ये काम करणा-या डॉक्टर आणि त्यांच्या अधीनिनीना समर्पित आहे. जे या संसाराला वाचवण्यासाठी स्वत:चा संसार विसरून काम करीत आहेत. सलाम तुमच्या कार्याला

...बायको..... मला थोड तरी सिरीयसली घेत जा !

---------------------------------------------

प्रेम करतोस माझ्यावर, मला पण करू देत जा...

प्रेम करतोस माझ्यावर, मला पण करू देत जा...||

...बायको .....मला थोड तरी सिरीयसली घेत जा..!!

---------------------------------------------

बाहेर कामावर जातांना सर्व तयारी करून पाठविते...

जणू काही शाळेत जाताना आई करायची तेच आठवते...||

माझे काम मला कधी तरी करू देत जा...

...बायको .....मला थोड तरी सिरीयसली घेत जा..!!

---------------------------------------------

ओ.पी.डी. ला असताना पण ,मेसेज करून काही विसरले हे सांगते...

आता परत येणार कसे ? हे उत्तर देखील तूम सांगते...||

जमलं..तर तू पण ओ.पी.डी. ला सोबतच येत जा...

...बायको .....मला थोड तरी सिरीयसली घेत जा..!!

---------------------------------------------

तू पण डॉक्टर मी पण डॉक्टर,पॅशंट चे TREATMENT मात्र मलाach विचारते...

मी सांगितल्यावर...हे तर मला आधीच माहित होत असं सांगते...||

माझा इलाज मात्र तूच करत जा...

...बायको .....मला थोड तरी सिरीयसली घेत जा..!!

---------------------------------------------

मी मोठा तू लहान ,तरी तुलचबर असते...

म्हणूनच लोकं म्हणतात,जसं दिसते तसंच नसते...||

माझे बरंच नसले तरी निदान ऐकून तरी घेत जा...

...बायको .....मला थोड तरी सिरीयसली घेत जा..!!

---------------------------------------------

असे मित्र नकोत,मैत्रिणी तर बिलकुल नसाव्यात...

मित्र-मैत्रिणी नाही ना, फक्त आठवणीत तरी असाव्यात...||

नाईट मधली थर्टी तू पण कधी भेट जा...

...बायको .....मला थोड तरी सिरीयसली घेत जा..!!

---------------------------------------------

अश्रिंच रहा मैत्रिणी सारखी,सर्व सुख:दुख:त आयुष्यमर..

हे जग देखील वाटते लहान,तुझ्यास त्या हसऱया गालासमोर...||

नेहमी मला तसाथ अश्रिंच देत जा...

...बायको .....मला थोड तरी सिरीयसली घेत जा..!!

लेखक -

डॉ. संघर्ष अनुसया सदाशिव राठोड

वैद्यकीय अधिकारी तथासचिव, मॅग्मो संघटना, यवतमाळ
मो.नं. ९५०३३४३५७९
संकलन -

डॉ. नरेंद्र कौशल्या शेषराव डोमके

अध्यक्ष, प्रसिद्धी सेल, मॅग्मो महाराष्ट्र

योगदानामध्ये सहभागी व्हा आणि अभिमान अनुभवा

सदस्य व्हा